२५ मे, २०२०

मन

परमेश्वर हा एक सर्वश्रेष्ठ निर्माता आहे... माणसाला त्यान पंचेद्रीयांव्यतिरिक्त 'मन' हा एक जास्तीचा अवयव दिला, त्यानं तो इतर पशुमात्रांपासून वेगळा आणि श्रेष्ठ ठरला.....  आज मनाची किंमत ती काय?...अडगळीच्या खोलीतल्या उंचावर असलेल्या कोळ्याच्या जाळ्याइतकी...हो नक्की तेवढीच, वर्षानुवर्षांनी खितपत पडलेल्या, धुलिकणांनी माखून गेलेल्या त्या जाळ्या... बुद्धीनंतर मनालाही संस्कारांचा ऐवज द्यायला का विसरतो आपण?..प्रतिक्षणी नवा जन्म घेण्याची शक्ती मनाजवळ असते, पण त्याला ते शिकवावं लागत... मनाची ताकद मनालाच कुणीतरी दाखवायची असते, त्याने ती ताकद उचलली की मग सगळं सोप असत... मग ते मनच तुम्हाला एक आयुष्य पुरणार नाही इतक्या युक्त्या सुचवतं...मग ते लेखकाला कथानक पुरवतं, कवीला शब्द सुचवतं, चित्रकाराला चित्र, संगीतकाराला चाल...केवळ संस्कारांपायी आजची मनं ही अरसिक आहेत, बुद्धीविलासानं ती अतिव्यवहारी झालीत, मनोधर्म विसरलीत... जेव्हा बघावं तेव्हा ती मोबाईलच्या प्रकाशमान चौकटीत पडलेली सापडतात, दिव्याभोवतीच्या चिलटांसारखीच...ही चौकट इतकी उष्ण असते की ती पोळून लुळीपांगळी होतात...मग त्यांना वासनेचे विचित्र हातपाय फुटतात आणि ती भान हरपून विक्षिप्तपणे धावू लागतात,भरकटतात, हरवतात...अगदी कायमचीच!! ही बिथरलेली मन पुन्हा कितीजणांना आणि कशा अवस्थेत सापडतात त्याचे त्यांनाच ठाऊक!!🌸

                                                    -sushब्द...🌸                               

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वास्तुपुरुष

भरलेल्या आभाळानं पहाटेचा उसासा रोखून धरला होता. कोपऱ्यांना गुडघ्याशी मुडपून दोन्ही हाताच्या आवळलेल्या मुठी हनुवटीशी एकत्र ठेवत ए...