रोष
दत्तानं हातातलं पत्र खिशात घातलं. अरविंदा कुठंच दिसत नव्हता. त्यानं वाड्याच्या आजूबाजूच्या खोल्या चाचपल्या. माडी बघून आला. तेवढ्यात मागं परसाच्या बाजूला लांबून कोठून तरी खटखट आवाज येऊ लागला. तो धावत आवाजाच्या दिशेनं गेला. अरविंदा झाडाआड उभा होता. समोर काका कुदळीनं खणत होता.
इकडं ठो आवाज करत आगीचे भलेमोठे गोळे वाड्यावर पडू लागले. गोठ्यावर पडलेल्या गोळ्यांपेक्षा ते दसपटीनं मोठे होते. क्षणार्धात वाडा पेटला, अगदी चारी बाजूंनी. गावात हाहाकार उडाला. सगळे लोकं वाड्याकडं पळत येऊ लागले तरी गोळे पडतच राहीले. काही लोकं काकाकडं आली. त्याला सांगू लागली, समजावू लागली तरी काका खणतच राहीला. पेटलेल्या गोळ्यांचा रोष आणि आकार बघून त्यातल्या एकाही जणाची पुढं यायची धडगत झाली नाही. जणू ते बैतोबाचा कौल होऊन छळलेल्या सुखवास्तूंच्या अग्नीरुपानं बरसत होते. वाड्याच छत कोसळल्यावर गोळे येणं बंद झालं. लोकं जमून पाणी ओतायच्या आतच वाड्याचा पार चुराडा झाला. राख झाली.
गावाचा आप्पा आणि दत्ताचा काका दुसऱ्या कुरकुडीची फुलं शोधू लागला. पाणी शिंपडू लागला. रंग बघू लागला. पांढऱ्या फुलाच्या कुरकुड्या लाल झाल्या.
....दत्तानं खिशातलं पत्र बाहेर काढत अरविंदाच्या हातात ठेवलं. पत्राचा मागचा मजकूर बघून त्यानं दीर्घ श्वास घेतला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा